Posts

Showing posts from March, 2023

शेतकरी सरकारी कर्ज योजना... पंजाबराव देशमुख कृषी योजना...

 👨🏻‍🌾 *सरकारी योजना: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना काय आहे, कोण घेऊ शकतं लाभ?* 🧐 शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्प दराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनाने अंमलात आणली आहे.  👉 त्यानुसार, या योजनेचा लाभ पिक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद घेऊ शकतात. 📄 शासन निर्णय दि. 11 जून 2021 अन्वये सन 2021-2022 या वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेण...

आता हफ्त्यावर लग्न करता येणार.. EMI OPTION AVAILABLE

 होय तुम्ही अगदी खरे ऐकले आहे.. आजच्या जमान्यात लग्न जमवणे खूप मुश्किल झाले आहे आणि त्यातला त्यात लग्नाचा होणारा अवाढवी खर्च पाहून आता आपल्या देशात हफ्त्यावर (EMI) लग्न करणे ही नवीन योजना चालू झाली आहे.. फिनटेक कंपनी संकशने ही सुविधा आणली आहे. या सुविधेसाठी त्यांनी रेडिसन हॉटेल सोबत करार केला आहे. येत्या दिवसात ही फॅसिलिटी संपुर्ण देशात सुरु करण्याचा कंपनीचा प्लॅन सुरू आहे. सीइओ आणि को-फाउंडर आकाश दहियांच्या मते, आता पर्यंत त्यांच्याकडे 'फ्लाय नाउ पे लेटर' होतं त्यानंतर आता त्यांनी 'मॅरी नाऊ पे लेटर' चालू केलं आहे. तरी या विषयी अजून जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. जशी माहिती मिळेल तशी तुम्हाला सांगितली जाईल. त्या साठी नेहमी आपल्या ब्लॉग वर विझिट करा व गरजू लोकांपर्यंत पोहोचवा.. धन्यवाद...🙏

या महिलांना मिळणार नाही ST मध्ये सुट...

 सर्व महिलांना ST मध्ये 50 टक्के सवलत असताना नेमक्या कोणत्या महिलांना 50 टक्के सवलतीचा लाभ प्रवासात मिळणार नाही असा प्रश्न अनेकांनी केला.  मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी हा निर्णय लागू होण्यापूर्वी तिकीट रिझर्वेशन केले आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही. असं सांगण्यात येत आहे..

पशुधन कर्ज योजना

 पशुपालन योजना पशुसंवर्धन हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे परंतु पशुपालन सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही पैसे खर्च करावे लागतील जसे की जनावरे खरेदी करणे, पशुगृह बनवणे आणि या प्राण्यांसाठी अन्नामध्ये गुंतवणूक करणे.  भारतात दुभत्या जनावरांचे महत्त्व आणि संख्या नेहमीच जास्त राहिली आहे. शेती, आरोग्य आणि उदरनिर्वाहासाठी पशुपालन हे प्रथम शेतकरी कुटुंबांद्वारे केले जात होते आणि मोठ्या प्रमाणात आजही आहे. पण आता अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय म्हणून त्याचा अवलंब करत आहेत.  यासाठी स्टेट बँकेद्वारे एसबीआय पशुसंवर्धन कर्ज योजना चालवली जात आहे प्रत्येक बँकेप्रमाणे, सरकारी मालकीची स्टेट बँक ऑफ इंडिया What Is SBI Card देखील आपल्या ग्राहकांना व्यापारासाठी क्रेडिट सुविधा प्रदान करते. जर एखाद्या शेतकऱ्याकडे म्हैस, गाय किंवा इतर पाळीव दुभती जनावरे असतील. तर SBI बँकेकडून कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकता. या कर्ज योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना जनावरांच्या संख्येनुसार 40,000 ते 60,000 पर्यंत कर्ज दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या पशुपालन व्यवसायाचा विस्तार करू शकतील. कर्ज योजनेचे नाव –...

नव नियुक्त सरपंचाला किती मानधन मिळते....

  Gram Panchayat New Salary गावातील मुख्य नागरिक मानले जाणारे सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढलेले आहे. त्यासंबंधी एक शासनाकडून शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. पगार किती रुपयांनी वाढले व आधी किती होते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आपल्या गावातील सरपंचाला पगार किती मिळतो हे आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे. गावच्या विकासाची जिम्मेदारी गावचे प्रमुख म्हणजे सरपंच यांवर असते, मग यांना मानधन किती मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर याचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000 सरपंच – ₹ 3000 ₹ प्रति महिना उपसरपंच – ₹ 1000 प्रति महिना सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो   8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या सरपंच – ₹5000 प्रति महिना उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो अशा प्रकारे आपण समजून घेतले की नव नियुक्त सरपंचाला किती मानधन अथवा भत्ता मिळतो.. सदरील मानधनात चढ उतार पणा पण असू शकतो..

मनोगत...

 सर्व प्रथम सर्वांना नमस्कार...🙏🙏🙏   मी जयशंकर चव्हाण अवलिया या ब्लॉग वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो.      आजच्या या धावत्या युगात माहिती तंत्रज्ञान आपल्या पर्यंत पोहचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे .. आशा आहे की आपण त्याला उत्तम प्रतिसाद द्याल.. सदर ब्लॉग हा निव्वळ माहिती तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. काही चूक भूल झाली तर लहान भाऊ समजून माफ करावे..                                               आपला विश्वासू....                                              जयशंकर चव्हाण                                             7774978893              ...